आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले ( बाबा राजे )
श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले ( भाऊसाहेब महाराज )

About

Baba Raje

अजिंक्यतारा

ऐतिहासिक सातारा म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो किल्ले अजिंक्यतारा आणि छत्रपतींची गादी! छत्रपती शिवरायांच्या घराण्याचा समाजकारणाचा, समाजसेवेचा वारसा भाऊसाहेब महाराजांनी अखंडित सुरु ठेवला होता. त्यांच्या अकाली निधनानंतर हा वारसाजोमाने पुढे नेला तो म्हणजे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी. सातारा आणि जावली तालुक्यांच्या सर्वांगिण विकासासह अजिंक्य उद्योग समुहाला उभारी देण्याचे शिवधनुष्य लीलया पेलणार्‍या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या अष्टपैलू कामगिरीने राजकारणात एक आदर्श घालून दिला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा आणि जावली तालुक्यात विकासगंगा कायम प्रवाहित ठेवून मतदारसंघाचा सर्वांगिण विकास साध्य केला आहे. अनेक सहकारी संस्थांना उर्जितावस्था देत अजिंक्य उद्योग समुहाला सहकाराच्या उच्च शिखरावर विराजमान करुन हजारो हातांना काम आणि तालुक्यातील शेतकर्‍यांना हक्काचे दाम मिळवून देऊन आ. शिवेंद्रसिंहराजेंनी स्व. अभयसिंहराजे भोसले यांचा समाजसेवेचा वारसा अखंडीत ठेवला आहे. विकासकामात राजकारण न आणता, पक्षीय भेदभावास थारा न देता, प्रत्येकाचे प्रश्‍न सोडवणार्‍या, मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास, हे ब्रिद सत्यात उतरवून एक आदर्श समाजकारणी कसा असावा, याचे मुर्तीमंत उदाहरण बनलेल्या, सर्वसामान्यांच्या या नेतृत्वाने राज्याच्या राजकीय पटलावर आपला वेगळा ठसा उमठवला आहे. सत्तेपेक्षा मतदारसंघाचा विकास केंद्रबिंदू मानून अखंड कार्यरत राहणारे आ. शिवेंद्रसिंहराजे समाजकारणातील 'अजिंक्यतारा' ठरले आहेत.

story teller

१९७८ मध्ये आ. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या रुपाने सातारा तालुक्याला प्रभावी नेतृत्व लाभले आणि वाई अथवा कराड मतदारसंघावर अवलंबून राहणार्‍या सातारा तालुक्याला विकासाची एक वेगळी आणि सकारात्मक दिशा मिळाली. स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या परिसस्पर्शाने सातारा तालुक्याचे खर्‍या अर्थाने सोने झाले. आमदार ते सहकारमंत्री अशी अनेक पदे भूषविणार्‍या भाऊसाहेब महाराजांनी त्या- त्या पदांना साजेशे काम करुन सातारा तालुक्याचा चेहरामोहरा बदलून जिल्ह्याच्या राजकारणात सातारा तालुक्याला महत्वाचे स्थान निर्माण करुन दिले. भाऊसाहेब महाराजांच्या अकाली निधनानंतर तालुका आपल्या भाग्यविधात्या नेतृत्वाला पारखा झाला. स्व. भाऊसाहेब महाराजांनंतर सातारा तालुक्यात सुरु झालेली विकासाची गंगा अविरत सुरु ठेवण्याची जबाबदारी त्यांचे सुपुत्र आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर आली. समाजकारणाचे बाळकडू मिळालेल्या शिवेंद्रसिंहराजेंनी लहान वयात ही जबाबदारी समर्थपणे पेलली आणि तालुक्याच्या राजकारण, समाजकारण आणि सहकार क्षेत्रात अलौकिक कर्तुत्वाने एक आदर्श निर्माण केला.

भाऊसाहेब महाराजांच्या काळातील जुन्या, जेष्ठ कार्यकर्त्यांच्यासोबत नव्या पिढीतील युवा कार्यकर्त्यांची सांगड घालून त्यांनी सातारा विधानसभा मतदारसंघात विकासाचा झंजावात सुरु केला. अल्पावधीतच आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपले नाव कोरले. स्व. भाऊसाहेब महाराजांची उणीव आ. शिवेंद्रसिंहराजेंनी भरुन काढली आणि सातारा आणि जावली तालुक्याला नवी दिशा देण्याचे काम केले आहे. दांडगा जनसंपर्क, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे, रात्री, अपरात्री, कोत्याही प्रसंगी जनतेसाठी उपलब्ध असणारे, विनयशिल, संयमी, स्पष्टवक्ते, विकसनशील नेतृत्व, राजकारणाला समाजकारणाची जोड देणारे कृतीशिल नेतृत्व आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या रुपाने सातारा- जावली मतदारसंघाला लाभले आहे. कृषी- औद्योगिक- शैक्षणिक क्रांतीस्व.

अभयसिंहराजे भोसले यांनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून विकासगंगेचा उगम करुन सातारा तालुक्यात कृषी- औद्योगिक विकासाला चालना दिली. अजिंक्य उद्योग समुहाच्या माध्यमातून स्व. भाऊसाहेब महाराज यांनी सातारा तालुक्यातील बेरोजगारीला लगाम घालण्याचे काम केले. त्यांच्या पश्‍चात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अजिंक्य उद्योग समुहाला सहकाराच्या उंच शिखरावर नेवून ठेवले आहे. केवळ साखर निर्मीतीवरच अवलंबून न राहता साखर कारखान्यात इथेनॉल प्रकल्प, सहवीज निर्मीती प्रकल्प असे मुल्यावर्धित प्रकल्प सुरु करुन साखर उद्योगाला खर्‍या अर्थाने उर्जीतावस्था प्राप्त करुन दिली. आज शेतकऱ्यांच्या ऊसाला एफआरपीप्रमाणे वेळेत संपूर्ण बिल अदा करणारा राज्यातील एकमेव कारखानाअसा नावलौकिक अजिंक्यतारा कारखान्याचा आहे. अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीत प्रत्यक्ष सूत उत्पादास प्रारंभ करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्व. भाऊसाहेब महाराज आणि सातारा तालुक्याचे स्वप्न पुर्णत्वास नेले. सूत गिरणीच्या माध्यमातून तालुक्यातील शेकडो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला असून प्रत्येक हाताला काम देण्याचे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न खर्‍या अर्थाने सत्यात उतरले आहे.

कारखाना कार्यस्थळावर सुरु करण्यात आलेल्या अभयसिंहराजे भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रीकी महाविद्यालयामुळे सातारा तालुक्यासह जिल्हाभरातील गोरगरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली झाली. मुलींना मोफत शिक्षण देणार्‍या या महाविद्यालयाने असंख्य गुणवत्ताधारक विद्यार्थी आणि इंजिनियर्स घडवले आहेत. अजिंक्यतारा सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी- विक्री संस्थेच्या माध्यमातून सातारा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या मालाला दर्जा आणि रास्त भाव मिळवून दिला जातो. शेतकर्‍यांचा माल अधिक दर्जेदार असावा, त्याला चांगला भाव मिळावा म्हणून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून संस्थेच्या कोल्ड स्टोरेज युनीटची उभारणी झाली. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आधूनिक शेतीची ओळख होण्यासाठी फळे, फुले संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय ख्यातीप्राप्त निसर्ग कृषी प्रदर्शनात दरवर्षी शेतकर्‍यांची जत्रा भरते आणि या आधुनिक कृषी प्रदर्शनात जिल्हाभरातील शेतकर्‍यांना आपण शेतकरी असल्याचा अभिमान वाटतो. शेतकर्‍यांचा माल थेट ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी गहू- ज्वारी, तांदूळ महोत्सव आयोजित केले जात असून आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळे सातारा तालुक्यात कृषी- औद्योगिक आणि शैक्षणिक क्रांती घडली आहे. सातारा शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवला.

सातारा शहराचा जिव्हाळ्याचा आणि सातारकरांच्या भविष्याच्यादृष्टीने अतीमहत्वाचा प्रश्न म्हणजेच पाणीप्रश्न. हाच पाणीप्रश्न सोडवण्यासाठी दूरदृष्टी लाभलेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ऐतिहासिक ब्रिटीशकालीन कास धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आणि अथक प्रयत्न करून हा निर्णय सत्यात उतरवला. पुढील ५० वर्षांचा विचार करुन सातारा शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी त्यांनी कास धरणाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळवून दिली. सातारा जावली या भल्यामोठ्या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहराच्या विकासाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. सातारा शहराला आणि आसपासच्या पंधरा ते वीस गावाना वर्षभर मुबलक पाणी मिळावे ही दूरदृष्टी ठेवून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी २०१० सालीच कास धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. आघाडीसरकारमधील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. दि. ३ ऑगस्ट २०१० रोजी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार मंत्रालयातील जलसंपदा विभागात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तवावर चर्चा झाली आणि या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यावेळी जलसंपदा खाते अजित पवार यांच्याकडे असल्याने त्यांनी सदर प्रस्तावाला मंजूरी देत राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून ३९ कोटी रुपये मंजूर करुन दिले. कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामाला मंजूरी मिळाल्यानंतर काहीही करुन सातारकरांचा पाणीप्रश्न सुटावा यासाठी कास धरण उंची वाढवण्यात अडथळा ठरलेल्या महसूल व वनविभाग, पर्यावरण विभाग, युनेस्को, नोडल बॉडी दिल्ली, राष्ट्रीय पुरातत्व विभाग, जलसंपदा विभाग, राष्ट्रीय हरित लवाद आदी विभागांच्या परवानग्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळेच सातारा नगर पालिकेला मिळाल्या. त्यानंतर कास धरण उंची वाढवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. कास धरण प्रकल्पाचे काम ७५ ते ८० टक्के पुर्ण झाले होते. मात्र वाढीव निधीची तरतूद न झाल्याने अनेक महिन्यांपासून पुढील काम रखडले आणि कास धरण प्रकल्प पुर्णत्वास जाणार का? सातारकरांचा पाणीप्रश्‍न सुटणार का, असे प्रश्‍न निर्माण झाले होते. मात्र पुन्हा एकदा आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पासाठी वाढीव ५७.९१ कोटी रुपये निधीला मान्यता देण्यात आली. या निधीला राज्याच्या वित्त विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्यक होते. त्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पाठपुरावा केला. ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कास धरण प्रकल्पाच्या सुधारीत प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळून निधी मंजूर करण्याची मागणी केली. तसेच प्रकल्पामुळे सातारा, कास ते बामणोली हा रस्ता बाधीत झाला असून या रस्त्यावरील नवीन पुलालाही निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. ना. अजित पवार यांनी तत्काळ वित्त विभागाच्या अधिकार्‍यांना सुचना देवून नवीन पुलासह कास धरण प्रकल्पासाठी वाढीव निधीस मान्यता देण्याच्या सुचना अधिकार्‍यांना केल्या. ना. पवार यांच्या सुचनेनुसार वित्त विभागाने तत्काळ ५७.९१ कोटी रुपये निधीला प्रशासकीय मान्यता दिली. या निधीची तरतूद होणे आवश्यक होते. तत्कालीन दोन दिवसीय अधिवेशनात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांची भेट घेवून कास धरण प्रकल्पाच्या वाढीव निधीच्या प्रस्तावाला मान्यता देवून निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. तशा आशयाचे पत्रही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांना दिले. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार ना. पवार यांनी कास धरण प्रकल्पासाठीच्या वाढीव ५७.९१ कोटी निधीची तरतूद पाणीपुरवठा विभागातून केली. यामुळे कास धरण प्रकल्पाचे रखडलेले काम पुन्हा सुरु होवून पुर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला. कास धरण प्रकल्पासाठीच्या सर्वच अडचणी दूर झाल्या आणि धरणाच्या उंची वाढवण्याचे काम येत्या काही महिन्यात पुर्ण होईल हे निश्‍चित. कास धरण उंची वाढवण्याच्या प्रकल्पामुळे सातारा, कास ते बामणोली हा रस्ता बाधीत होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर नवीन पूल बांधणे आवश्यक असून त्यासाठीही ३.५ कोटी रुपये निधीची तरतूद ना. पवार यांच्या सुचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामालाही गती मिळणार असून लवकरच भव्य आणि दर्जेदार रस्ता दळणवळणासाठी उपलब्ध होणार आहे.

जल, सिंचनक्रांती : स्व. अभयसिंहराजे भोसले यांनी सातारा तालुका सुजलाम सुफलाम व्हावा, हे स्वप्न उराशी बाळगून उरमोडी धरणाची पायाभरणी केली. आज धरण मोठ्या दिमाखाने उभे असून या धरणातील पाणी कालव्यांद्वारे तालुक्याच्या कानाकोपर्‍यात पोहचले आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन उरमोडी धरणाचे पाणी शेतकर्‍याच्या शेतात पोहचवून स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साकार केले आहे. सातारा आणि जावली तालुक्यात असंख्य बंधारे बांधून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारसंघात जल क्रांती घडवून आणली आहे. जावली सारख्या दुर्गम, डोंगराळ भागात ठिकठिकाणी बांधलेल्या बंधार्‍यांमुळे परिसरातील पाणी टंचाई कायमची दूर झाली आहे. सातारा तालुक्यातही अनेक ठिकाणी बंधारे बांधले असून या बंधार्‍यांमुळे हजारो हेक्टर जमिनीला बारमाही पाणी उपलब्ध झाले आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचा शेतीसाठी नियोजनबध्द वापर होत असल्याने सातारा- जावली मतदारसंघ खर्‍या अर्थाने सुजलाम सुफलाम झाला आहे. जावली तालुक्यातील ५४ गावांचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून बहुचर्चीत आणि महत्वकांक्षी बोंडारवाडी प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यातून हे धरण लवकरच पुर्ण होणार आहे. सातारा शहरासह सातारा आणि जावली तालुक्यातील प्रत्येक गाव पिण्याच्या पाण्यासाठी स्वयंपुर्ण व्हावे, हे ध्येय ठेवून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदारसंघातील पाणीप्रश्‍न कायमस्वरुपी सोडवण्यास प्राधान्य दिले आहे. सातारा शहरालगत असलेल्या शाहुपूरी ग्रामपंचायतीला भेडसावणारा पाणीप्रश्‍नही नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सोडवला आहे. शाहूपुरीसह दिव्यनगरी, कोंडवे, अंबेदरे, दरे बु. आदी गावात स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या आहेत. जावली तालुक्यातही याचपध्दतीने प्रत्येक गावात स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून होत आहे.

हद्दवाढ आणि मेडिकल कॉलेजचा प्रश लावला मार्गी : राजकारणापेक्षा सातारा- जावली मतदारसंघाच्या विकासाला कायम प्राधान्य देणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्य मंत्रीमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर लगेचच विकासकामे मंजूरीसाठी पाठपुरावा सुरु केला होता. राज्याच्या रखडलेल्या आणि चर्चेच्या ठरलेल्या खातेवाटपानंतर झालेल्या एकदिवसाच्या विशेष अधिवेशनादरम्यान आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहराची हद्दवाढ, जावली तालुक्यातील महत्वकांक्षी बोंडारवाडी धरण आणि सातारा जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले मेडीकल कॉलेज ही विकासकामे मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले होते. हे तीनही प्रश्न तातडीने मार्गी लावावेत अशी आग्रही मागणी त्यांनी केली. एकदिवसाच्या अधिवेशनादरम्यान आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबीत आहे. शहराची हद्दवाढ झाल्यास शहरालगतच्या उपनगरे आणि त्रिशंकू भागांच्या विकासाला चालना मिळणार आहे. सातारा शहराचा आणि आसपासच्या परिसराचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार सोयी- सुविधा मिळण्यासाठी हद्दवाढीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करणे अत्यावश्यक असल्याने हा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली. उपनगरांच्या विकासासाठी हद्दवाढ हा एकमेव पर्याय असून सातारा पालिकेने वारंवार सदरचा प्रस्ताव नरविकास विभागाकडे पाठवला. याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. विधिमंडळात दि. २९ फेब्रुवारी २०१६ रोजी तारांकित प्रश्नही केला होता. नगरविकास विभागाने सुचविलेल्या सर्व त्रुटींची पुर्तता सातारा नगर पालिकेने केली. त्यामुळे या प्रस्तावाला तातडीने मंजूर द्यावी आणि सातारा शहर व उपनगरांच्या सर्वागिण विकासाचा अडसर दूर करावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी लेखी निवेदनाद्वारे ना. ठाकरे यांच्याकडे केली होती. हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन ना. ठाकरे यांनी त्यावेळी दिले होते. दरम्यान, हद्दवाढ प्रस्ताव मंजुरीबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नगरविकास मंत्री ना. शिंदे यांनाही लेखी निवेदन दिले आणि त्यांनीही याबाबत तातडीने कार्यवाही करु, असे आश्वासन दिले होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून अखेर हद्दवाढ मंजूर करून घेतली. मंजुरीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हाती दिले. हद्दवाढ मंजूर करून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहराच्या विकासाला गती मिळवून दिली आहे आणि त्रिशंकू भागालाही विकासाच्या प्रवाहात आणले आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या सहकार्याने सातारा मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली. कॉलेजसाठीच्या ६२ एकर जागेचा प्रश्न आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे सुटला आणि कॉलेजसाठी ४९५ कोटी रुपये निधी मंजूर झाला. दरम्यान, कॉलेजसाठी मंजूर असलेल्या जागेवर भव्य इमारत बांधली जाणार असून त्यासाठीची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया त्वरिव व्हावी आणि मेडिकल कॉलेज सुरु व्हावे, त्यासाठीची पदनिश्चिती आणि पदनिर्मिती करावी अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांच्याकडे केली होती. या दोन्ही मागण्या मान्य झाल्या. सातारा जिल्ह्याच्यादृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनलेल्या मेडीकल कॉलेज उभारणीसाठी मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून कॉलेजच्या जागा हस्तांतरणानंतर आता १०० विध्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय उभारणीसाठी एकूण ४९५ कोटी ४६ लाख एवढ्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून सातारच्या मेडिकल कॉलेजचा प्रश्न आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सकारात्मक पाठपुराव्यामुळे आणि उपमुख्यमंत्री ना. अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिक कार्यमंत्री ना. अमित देशमुख यांच्या शंकर्याने मार्गी लागला असून लवकरच प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे.

पर्यटनाला चालना : सातारा शहर आणि परिसराला समृध्द असा ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा लाभला आहे. मतदारसंघाचा सर्वांगिण विकास साधताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पर्यटनालाही चालना दिली आहे. सातारा शहरातील छत्रपती शिवाजी वास्तू संग्रहालयासाठी नवीन, सुसज्ज आणि देखणी इमारत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांमुळे मध्यवर्ती बस स्थानकाशेजारी उभी राहिली आहे. येत्या काही दिवसांतच या नवीन प्रशस्त वास्तूत शिवकालीन व ऐतिहासीक वस्तू स्थलांतरीत केल्या जाणार असून या प्रशस्त वास्तू संग्रहालयामुळे सातारा शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. जागतीक वारसा स्थळामध्ये स्थान मिळालेले कास पठार पाहण्यासाठी देश- परदेशातून पर्यटक हजेरी लावतात. कास पर्यटनवाढीच्या दृष्टीने आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सातारा, बोगदा ते अनावळे या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम मार्गी लावले आहे तर कास, बामणोली भागातील १२ दुर्गम गावातील पोच रस्त्यांच्या कामासाठीही भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे. कास ते महाबळेश्वर या जुन्या शिवकालीन राजमार्गाचे काम मार्गी लावून दोन्ही पर्यटनस्थळे एकमेकांना जोडली आहेत. यामुळे पर्यटन वाढीसह इंधन आणि वेळेची बचत होणार आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसागर जलाशयात 'वॉटर स्पोर्ट' प्रकल्पाला मंजुरी मिळवली. लवकरच हा प्रकल्प सुरु होऊन या भागातील पर्यटनवाढीबरोबरच रोजगारनिर्मिती आणि व्यवसायवृद्धीला चालना मिळणार आहे. नैसर्गिक संपत्तीने नटलेल्या जावली तालुक्यातही पर्यटनवाढीसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रस्ताव तयार करुन त्यांच्या मंजूरीसाठी पाठपुरावा सुरु केला आहे. कुसुंबी पर्यटनस्थळाला जोडणारे रस्ते, संपुर्ण मेढा भाग कास बामणोलीला जोडणारा रस्ता, कास बामणोली ते महाबळेश्‍वर रस्ता असे महत्वपुर्ण रस्ते तयार करुन दळणवळणाची उत्तम सोय करुन पर्यटकांचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी महत्वपुर्ण पावले त्यांनी उचलली आहेत. ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनस्थळ असलेल्या सज्जनगडावर जाण्यासाठी परळी येथून रोप वे करण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत. गोडोली येथील नैसर्गिक तळ्याच्या सुशोभोकरणासाठीही त्यांनी पाठपुरावा सुरु असून लवकरच यासाठी निधी उपलब्ध होणार आहे.

साहित्य, कला, क्रीडा व संस्कृतीचे जतन : राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करत असताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक चळवळीलाही उभारी देण्याचे महान कार्य सातत्याने केले आहे. विविध क्रीडा प्रकारात सातारा शहरासह जिल्हाभरातून खेळाडू तयार व्हावेत, यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शरिरसौष्ठव, भारोत्तोलन, कबड्डी, क्रिकेट, बॉक्सिंग, बास्केट बॉल, फुटबॉल, हॉकी, ऍथलेटीक्स आदी क्रीडा प्रकारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेतली असून अशा क्रीडा स्पर्धांना सातत्याने मदतीचा हात दिला आहे. स्वत: एक उत्तम धावपटू असलेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुंबई, गोवा, सातारा आदीठिकाणी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन यश संपादन केले असून मॅरेथॉन मध्ये धावणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार अशी वेगळी ओळखही त्यांनी निर्माण केली आहे. मतिमंद खेळाडूंना आर्थिक मदत होण्याच्या उद्देशाने त्यांनी महाराष्ट्र राज्य डेफ क्रिकेट फेडरेशन विरुध्द मराठी सिने कलावंतांच्या प्रदर्शनीय क्रिकेट सामान्याचे तसेच मेढा येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे नेटके आयोजन केले आहे. जिल्हा क्रीडा संकुलात चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांच्या या पाठपुराव्यामुळेच आज जिल्हा क्रीडा संकुलात बास्केट बॉल, बॅडमिंटन, स्विमिंग आदी खेळामध्ये खेळाडूंची संख्या वाढत आहे. गेली अनेक वर्ष सातत्याने होत असलेल्या सातारा फेस्टीवलमुळे सांस्कृतिक चळवळ जोपासण्याचे कार्य आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हातून घडत आहे. साहित्यसंस्कृती वाढीसाठी सातार्‍यात होणारी साहित्य संमेलने, नाट्य संमेलने आदींसाठीही ते नेहमीच सहकार्याची भावना ठेवून साहित्य चळवळ वृध्दींगत करण्यासाठी प्रयत्न करत असतात.

गरजूंना मदतीचा हात : मतदारसंघात चौफेर विकास साधताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी समाजकार्याचा अनोखा आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जावली तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. या अतिवृष्टीच्या मयत झालेल्यांच्या वारसांना शासकीय मदत मिळवून दिली. ज्यांची घरे बाधित झाली त्यांना निवारा, अन्नधान्य दिले. सुमारे २५ गावातील शेतजमीन बाधित झाली होती. शेतजमीन दुरुस्ती मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी दुरुस्त करून दिल्या. धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. जावली तालुक्यातील महु- हातगेघर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला. उरमोडी, कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आदी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन तातडीने व्हावे आणि त्यांचे प्रश्‍न मार्गी लागावेत यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करुन जनतेला न्याय देण्याची भुमिका घेतली आहे. पवनचक्क्या, टोलनाके व औद्योगिक कंपन्या यामध्ये स्थानिक भुमिपुत्रांना प्राधान्य दिले जावे, यासाठी प्रसंगी आंदोलनाचे हत्यार उपसून भुमिपुत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केला आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्त, जळीतग्रस्त, उघड्यावर पडलेल्या कुटूंबांना आर्थिक मदतीचा हात देऊन त्यांचा संसार सावरण्याचा प्रयत्नही त्यांनी अनेकदा केला आहे. याशिवाय विविध प्रकारच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरांतून हजारो रुग्णांना जगण्याची नवी दिशा दिली गेली. जयपूर फूट शिबीराच्या माध्यमातून दिव्यांगांना मोफत कृत्रीत हाप, पाय बसवले, हजारो दिव्यांगांना कुबड्या, तीनचाकी सायकल, व्हील चेअर देवून या बांधवांचे जगणे सुसह्य करुन एक आदर्श समाजसेवक कसा असावा, याचे मुर्तीमंत उदाहरण आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यारुपाने जिल्ह्याने पाहिले आहे.

सातारा शहराचा कायापालट : ऐतिहासिक सातारा शहराला आधुनिकतेकडे नेताना शहरातील सर्वच रस्त्यांचे रुंदीकरण आणि दर्जेदार डांबरीकरण करण्याचा सपाटा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातत्याने लावला आहे. राज्य शासन, केंद्र शासनासह नगरोत्थान, जिल्हा नियोजन समिती, अशा मिळेल त्या योजनेतून निधी उपलब्ध करुन देऊन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहरातील रस्ते चकचकीत केले आहेत. पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटर उभारण्यात आला असून त्यामुळे वाहतूक कोंडी आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुचनेवरुन सर्वच रस्त्यांचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. पोवई नाका ते विसावा नाका (कोरेगाव रोड) या रस्त्याचे चौपदरीकरण, विसावा नाका ते कृष्णानगर या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम मार्गी लागले आहे. मोळाचा ओढा- मध्यवर्ती बस स्थानक ते गोडोली नाका या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १९ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली असून या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. पोवई नाका, जिल्हा रुग्णालय ते जरंडेश्‍वर नाका या रस्त्याच्या रूंदीकरणाचेही काम युध्दपातळीवर

सातारा- जावलीत विकासाचा झंजावात : सातारा आणि जावली तालुक्यातील प्रत्येक गावात कोट्यवधीची विकासकामे पुर्ण करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संपुर्ण मतदारसंघात विकासाचा झंजावात अखंड चालू ठेवला आहे. राजकीय गट- तट न पाहता विकासकामे केल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे हे एक लोकाभिमुख नेतृत्व असल्याचे अधोरेखीत झाले आहे. दुर्गम आणि डोंगराळ जावलीच्या खोर्‍यातील खेड्यापाड्यांना आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळे सोन्याचे दिवस आले आहेत. कोट्यवधीची विकासकामे खेचून आणत आमदारांनी आपल्या कतृत्वाचा नारा जावलीच्या दर्‍याखोर्‍यात घुमवला आहे. मेढा पंचायत समितीची प्रशासकीय इमारत, न्यायालयाची सुसज्ज इमारत, पोलीस ठाण्याची इमारत, ग्रामीण रुग्णालयांसाठी प्रशस्त इमारत व कर्मचारी निवासस्थान आदीसाठी कोट्यवधी रुपये निधी मिळवून देऊन ही सर्व कामे मार्गी लावली. मेढा ग्रामिण पाणीपुरवठा योजनेसाठी एक कोटी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी १ कोटी ६९ लाखाचा निधी मिळवला. गेली ३० वर्ष रखडलेल्या कुसुंबी- कोळघर रस्त्यासाठी ९० लाखाचा निधी उपलब्ध करुन या रस्त्याचा प्रश्‍न महतप्रयासाने मार्गी लावला. वेण्णा नदीवरील भामघर पुलासाठी ६० लाख, खर्शी बारामुरे रस्त्यावरील मोठ्या पुलासाठी ४० लाख, पावगणी कुडाळ रस्ता व महू गावाजवळच्या पुलासाठी दोन कोटी ६० लाखण एकीव ते दुंद रस्त्यासाठी १ कोटी ४० लाख निधी मिळवून दिला तर याच रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ३ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. बोंडारवाडी धरण, महू- हातगेघर रिंगरोडचे काम आणि या धरणाच्या प्रलंबीत कामांना चालना दिली. कोयना पुर्नवसीत गावांना नागरी सोयी- सुविधा मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मेढा ते सातारा रस्त्यासाठी २५ लाख, आलेवाडी खिंड पदमलेमुरा, रेंगडीमुरा धनगर पेढा रस्त्याच्या कामासाठी ८२ लाख, रेंगडीमुरा- मेढा रस्त्यावरील पुलासाठी १ कोटी ५० लाख रुपये निधी मिळाला. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी गेल्या पाच वर्षात सातारा आणि जावली मतदारसंघातील विकासकामांसाठी कोट्यवधी निधी उपलब्ध करुन दिला. बहुसं‘य कामे मार्गी लागली असून उर्वरीत सर्वच कामे प्रगतीपथावर आहेत. दुर्गम अशा जावली तालुक्यातील प्रत्येक गावात कोट्यवधीची विकासकामे करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी राज्याच्या राजकारणात एक आदर्श निर्माण केला आहे. डोंगराळ भागातील प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडून प्रत्येक गावात अंगणवाडी, प्राथमिक शाळेच्या इमारती बांधून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी या भागातील जनतेला खर्‍या अर्थाने ज्ञानाची कवाडे खुली करुन दिली आहेत. केवळ विकासकामे करण्याकडेच कल न ठेवता आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठीही सातत्याने प्रयत्न केले आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून विकासाचा झंजावात असाच सुरु राहणार असून येत्या काही दिवसांत सातारा- जावली मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलेला पहावयास मिळेल हे निश्‍चित ! जनहिताचे निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करणारे नेतृत्व अशी ख्याती आ. शिवेंद्रसिंहराजे यांची आहे. सातारा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामाच्या रुपाने आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे विचार पोहचले असून आ. शिवेंद्रसिंहराजे हे जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजे आणि जनतेतील प्रेम आणि जिव्हाळा एवढा वाढला की, सामान्य कार्यकर्ताच नव्हे तर सामान्य माणूसही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी थेट संपर्क साधू लागला. मागेल ते काम पुर्ण करण्याची धमक आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामध्ये असल्याने सातारा आणि जावली तालुक्यातील प्रत्येक गावात डांबरी रस्ता, वीज, समाजमंदीर, अंगणवाडी, शाळा इमारत, पाणीपुरवठा योजना असा चौफेर विकास झाला आहे. जनसामान्य थेट आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे येवू लागल्याने आपोआपच ऋणानुबंध वाढत गेला आणि आ. शिवेंद्रसिंहराजे हे आपल्या घरातीलच एक सदस्य आहेत अशी भावना जनसामान्यांमध्ये वाढीस लागली. विवाह सोहळ्याला उपस्थित राहणारे आ. शिवेंद्रसिंहराजे कोणताही भेदभाव न ठेवता मतदारसंघातील जनतेच्या सुख- दुख:त नेहमीच सहभागी होत असतात. त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे आणि जनता यांचे घनिष्ठ नाते निर्माण झाले आहे.

खरा कोरोना योध्दा : कोरोना महामारीमुळे संपुर्ण जगात हाहाकार उडाला आहे. आपल्या देशात आणि खास करुन महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु आहे. साधारण मार्च २०२० पासून सुरु झालेल्या या महामारीमुळे हजारो लाखो कुटुंबे उध्वस्थ झाली आणि आजही या साथीच्या आजाराचे थैमान सुरुच आहे. सातारा जिल्ह्यातही कोरोनाचे थैमान सुरु असून पहिल्या लॉकडाऊनपासूनच आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करुन जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. सातारा जावली मतदारसंघातील प्रत्येक वाडी, वस्तीवर अन्नधान्य पोहचवून भुकेल्या पोटांना आधार दिला. लॉकडाऊन शिथील होत असताना विविध प्रकारची दुकाने उघडण्यासाठी आणि दैनंदीन व्यवहार सुरळीत होण्यासाठीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातत्याने पाठपुरावा करुन सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढू लागली आणि मृत्यूच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ झाली. सातारा जिल्हा रुग्णालयासह सर्वच खाजगी रुग्णालयांमध्येही बेड शिल्लक नाही आणि त्यामुळे रुग्ण दगावत आहेत. या भयावह परिस्थितीला कुठेतरी आळा बसावा, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उदात्त हेतुने आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटूंबीयांनी स्वमालकीच्या विसावा नाका येथील पुष्कर हॉल येथे स्वखर्चाने ८२ बेडचे सुसज्ज असे कोव्हीड केअर सेंटर उभारले. या सेंटरमध्ये ४२ बेड हे ऑक्सिजन पुरवठ्यासह सुसज्ज, उर्वरीत ४० बेड विना ऑक्सिजनयुक्त होते. जिल्हा प्रशासनाने हे सेंटर जिल्हा रुग्णालयामार्ङ्गत चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जिल्हा रुग्णालयाकडून या सेंटरसाठी वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे हे सेंटर विनावापर पडून होते आणि गरजू रुग्णांना त्याचा उपयोगही होत नव्हता. पुष्कर कोव्हीड केअर सेंटर चालू करण्याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा जिल्हा प्रशासन आणि जिल्हा रुग्णालय प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. मात्र वैद्यकीय अधिकारी, नर्स, वार्डबॉय आदी स्टाङ्ग उपलब्ध नसल्याने सेंटर चालू होवू शकत नसल्याचे सांगण्यात येत होते. काळाची गरज पाहता रुग्णांवर उपचार होण्यासाठी हे सेंटर तातडीने सुरु होणे आवश्यक होते. त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क साधून रुग्णसेवेसाठी सेंटर सुरु केले. हे सेंटर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी खासगी हॉस्पिटलला शासनाप्रमाणेच विनामुल्य चालवण्यासाठी दिले. पुष्कर कोव्हीड केअर सेंटर हे रुग्णांच्या सेवेसाठी विनामुल्य चालवण्यासाठी देण्यात आले.

मेढा रुग्णालयात कोव्हीड केअर सेंटर सुरु : सातारा जावली असा भेदभाव कधीही न करणार्‍या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दोन्ही तालुक्याचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कोरोना महामारीतही त्यांनी सातारा आणि जावली दोन्ही तालुक्यात लक्ष देवून जनतेला कोरोनाच्या तडाख्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान जावली तालुक्यातही बाधीतांची संख्या वाढत असताना रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत आणि रुग्ण बरे व्हावेत यासाठी प्रशासनासह सर्वचजण प्रयत्न करत होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुचनेवरुन प्रशासनाने मेढा ग्रामीण रुग्णालयात ३० बेडचे कोव्हीड केअर सेंटर सुरु केले. या सेंटरसाठी डिजीटल एक्सरे मशीन हवी होती मात्र प्रशासनाला त्यासाठी निधी उपलब्ध होत नव्हता. हे समजल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कुटूंबाच्यावतीने रुग्णसेवेसाठी डिजीटल एक्सरे मशीन मेढा रुग्णालयास भेट दिले. रुग्णांसाठी आवश्यक असणारी इंजेक्शन्स प्रशासनाने उपलब्ध करुन द्यावीत. इंजेक्शन आणि औषधाविना रुग्ण दगावू नये, याची काळजी रुग्णालय प्रशासनाने घ्यावी, अशा सुचनाही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला केल्या. कोरोना महामारीमध्ये सामान्य माणसांपासून राजकीय, वैद्यकीय यासह सर्वच क्षेत्रातील जनजीवन भरडून निघाले आहे. अशा गंभीर परिस्थितीतही आ. शिवेंद्रसिंहराजे पायाला भिंगरी लावून सातारा- जावली मतदारसंघात जनतेच्या रक्षणासाठी धावत होते आणि आजही कोरोना महामारीतून जनतेची सुटका करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करतानाच जनतेच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीप्रमाणे अहोरात्र झटत आहेत. अशा अष्टपैलू व्यक्तीमत्वाला, खर्‍या कोरोना योद्याला जनता मनापासून धन्यवाद देत आहे. जनतेने वेळोवेळी टाकलेल्या विश्‍वासाला सार्थ ठरवून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली जबाबदारी नेहमीच पार पाडली आहे. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना भूरळ घातली. यामुळेच आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या भोवती युवा कार्यकर्त्यांचे मोहोळ वाढू लागले. नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थावर सत्ता असताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विविध पदांवर सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांलाही संधी दिली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या निस्वार्थी स्वभावामुळे हजारो कार्यकर्ते त्यांच्याशी मनाने जोडले गेले आहेत. केवळ कार्यकर्त्यांची फौज सोबत मिरवणार्‍या नेत्यांना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी एक आदर्श घालून दिला आहे. कार्यकर्त्यांना केवळ फिरवण्यापेक्षा त्यांच्या हातला काम मिळाले पाहिजे, कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे, हीच भुमिका आ. शिवेंद्रसिंहराजे यांची असल्याचे अनेक उदाहरणांवरुन स्पष्ट होते. आपला समाजसेवेचा वसा जपण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे नेहमीच प्रयत्नशील असतात. विकासाच्या झंजावातामुळे सातार्‍याप्रमाणेच जावलीतील कार्यकर्ते आणि सामान्य जनता आ. शिवेंद्रसिंहराजेंसोबत जोडली गेली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे कोणत्या राजकीय पक्षात आहेत, याहीपेक्षा ते जनतेच्या ह्रदयात कायस्वरुपी आहेत, हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. सातार्‍यासह जावलीतील प्रत्येक गावात मुलभूत सोयी- सुविधा पुरवून, विकासापासून वंचीत राहिलेल्या जनतेला त्यांनी प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. सत्ता कोणाचीही असो मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी खेचून आणणारे एकमेव लोकप्रतिनिधी अशी ख्याती असलेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात मतदारसंघातील अनेक महत्वकांक्षी प्रकल्पांना भरिव निधी मिळवून ही कामे मार्गी लावली आहेत. सातारा- जावलीचा विकास हाच आपला ध्यास हे ब्रीद घेतलेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या कतृत्वाने हे ब्रीद सार्थ ठरवले आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी कोणतीही तडजोड न करता आपले कर्तृत्व, जनतेचे प्रेम आणि पाठिंब्याच्या जोरावर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा- जावली मतदारसंघाचा कायापालट केला आहे. हा मतदासंघ विकासाचा रोल मॉडेल ठरावा यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे प्रयत्न असून आगामी काळात त्याचा प्रत्यय येईल, हे निश्‍चित!

अमर मोकाशी

About

Bhausaheb Maharaj

सहकारमहर्षी; स्व. भाऊसाहेब महाराज

छत्रपतींची ऐतिहासिक सातारा नगरी म्हणजे मराठ्यांची राजधानी! छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू (थोरले) महाराज यांचा जनसेवेचा समर्थ वारसा चालवणाऱ्या छत्रपती राजघराण्यात जन्मलेल्या श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांनी आपल्या कुशल, अभ्यासू आणि धाडसी वृत्तीने तहहयात जनसेवा करून छत्रपती घराण्याचा नावलौकिक वाढवला. छत्रपती घराण्याचा समाजसेवेचा वारसा जोमाने पुढे नेणाऱ्या स्व.अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांच्यामुळेच सातारा तालुका जिल्ह्याच्याच नव्हे तर, महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर ठळकपणे उमटला! 'विना सहकार नाही उद्धार' हे ब्रिद याचे मूर्तिमंत उदाहरण ठरलेल्या स्व. भाऊसाहेब महाराजांना सातारा तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून कायम ओळखले जाते. आज त्यांची ८० वा जयंतीदिन! यानिमित्त त्यांना वाहिलेली शब्द सुमनांजली!

story teller

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तमाम मराठी मनाची अस्मिता आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आराध्यदैवत. याच छत्रपतींच्या घराण्यात भाऊसाहेब महाराजांचा जन्म १६ मे १९४४ रोजी झाला. राजघराण्यात जन्म झाला असला तरी, इतर माणसांप्रमाणेच आपण एक माणूस आहोत या भावनेतून संपूर्ण जीवन जगताना स्व. भाऊसाहेब महाराजांनी अहोरात्र समाजासाठी कष्ट उपसले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या उक्तीप्रमाणे जीवन जगत स्व. भाऊसाहेब महाराजांनी समाजातील तळागाळातील लोकांसाठी आपले जीवन समर्पित केले. केवळ राजघराण्यात जन्म घेतला म्हणून माणूस मोठा होत नाही तर त्याच्या कार्यकर्तृत्वाने तो मोठा होतो, हे स्व. भाऊसाहेब महाराज यांनी आपल्या अजोड कर्तृत्वाने दाखवून दिले. सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक सातारा तालुक्याची अवहेलना होत असताना स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या रूपाने तालुक्याला एक उमदे आणि सक्षम नेतृत्व लाभले आणि सातारा तालुक्याचे नाव राज्याच्या राजकारणात आदराने घेतले जावू लागले. या तालुक्याचे नेतृत्व करताना स्व. भाऊसाहेब महाराजांनी संपूर्ण राज्यभरात सहकार क्रांती घडवली. सहकाराच्या माध्यमातून सातारा तालुक्यातील गोर- गरीब, शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्त करतानाच तालुक्याचा सर्वांगीण विकास घडवून आणला.

तालुक्याचा चौफेर विकास : राजकारणात सक्रिय झालेल्या भाऊसाहेब महाराजांनी राजकारणाला कमी महत्त्व देत समाजकारणासाठी वाहून घेतले. सातारा तालुक्यात सहकार क्रांतीबरोबरच जलक्रांती घडवून सातारा तालुक्याला सुजलाम सुफलाम केले. उरमोडी धरणाची निर्मिती करून सातारा तालुक्यासह दुष्काळी माण- खटाव तालुक्याची तहान भागवली. सातारा तालुक्यात ठिकठिकाणी पाणीसाठवण बंधारे बांधले. प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडले. प्रत्येक गावात अंगणवाडी, शाळा, व्यायामशाळा, सभामंडप, सुसज्ज ग्रामपंचायत इमारती उभ्या करून प्रत्येक गावाला विकासप्रवाहात आणले. सातारा तालुक्याचा चौफेर विकास साधून जिल्ह्यात सातारा तालुक्याला नेहमीच अग्रेसर ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यामुळेच सातारा तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून आजही स्व.भाऊसाहेब महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. मी राजा नाही, जनतेचा सेवक आहे, हीच भूमिका घेवून स्व. भाऊसाहेब महाराजांनी आपले संपूर्ण जीवन जनसामान्यांसाठी खर्ची घातले. अखंडपणे जनतेची सेवा केली आणि त्यामुळेच प्रत्येक घराघरात आपला हक्काचा माणूस म्हणून स्व. भाऊसाहेब महाराजांचा आजही आदराने उल्लेख केला जातो. निगर्वी, शांत, संयमी, नेहमी हसतमुख आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा जनसामान्यांचा राजा म्हणून स्व. भाऊसाहेब महाराजांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते आणि चंद्र, सूर्य असेल तोवर कायम घेतले जाईल यात तिळमात्र शंका नाही.

सहकारातून उघडले समृद्धीचे कवाड : राजकारणात असताना विविध जबाबदारीची पदे सक्षमपणे सांभाळून त्या पदाच्या माध्यमातून सातारा तालुक्यातील जनतेचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न स्व. भाऊसाहेब महाराज यांनी जीवनभर केला. तत्कालीन सहकार मंत्री असलेल्या भाऊसाहेब महाराजांनी संपूर्ण राज्यात सहकार क्रांती घडवून आणली. प्रत्येक गावात विकास सेवा सोसायट्यांचे जाळे विणले आणि जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला आर्थिक सक्षम करण्याचे अनमोल काम भाऊसाहेब महाराजांनी केले. 'विना सहकार नही उद्धार' हे ओळखूनच भाऊसाहेब महाराजांनी शेंद्रे ता. सातारा येथील उजाड माळरानावर अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून स्व. भाऊसाहेब महाराजांनी सातारा तालुकाच नव्हे, तर आसपासच्या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या हक्काची संस्था उभी करून दिली. आज याच साखर कारखान्यामुळे सातारा तालुक्यासह आपसपासच्या तालुक्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला उच्चतम दर मिळत आहे. याच कारखान्यामुळे हजारो शेतकरी कुटुंबांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. याच कारखान्यामुळे तालुक्यातील हजारो बेरोजगार हातांना रोजगार मिळाला आहे आणि याच कारखान्यामुळे सातारा तालुक्यासह परजिल्ह्यातीलच नव्हे, तर परराज्यातील सुद्धा असंख्य घरातील चुली दररोज पेटतात, ही वस्तुस्थिती आहे. भाऊसाहेब महाराजांनी विविध सहकारी संस्थांना शासकीय पाठबळ दिले आणि त्यामाध्यमातून तळागळती लोकांना, शेतकरी आणि काबाडकष्ट करणाऱ्या लोकांना समृद्धीची कवाडे खुली करून दिली.

विविध सहकारी संस्थांची उभारणी! : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यानंतर स्व. भाऊसाहेब महाराजांनी वळसे ता. सातारा येथे अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीची उभारणी केली. आज त्यांचे सुपुत्र आ.श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सूत गिरणीतून उच्चतम दर्जाचे सूत उत्पादित केले जाते आणि हे सूत देशी व परदेशी बाजारपेठेतही निर्यात केले जात आहे. सूत गिरणीच्या माध्यमातूनही हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून निर्माण होणारी वीज, वीज वितरण कंपनीला वितरित केली जाते. यामुळेच सातारा शहर आणि तालुक्यातील भारनियमन आटोक्यात आले आहे. स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या मार्गदर्शनातून अजिंक्य उद्योग समूहात विविध सहकारी संस्थांची उभारणी झाली आणि सहकारातील मानबिंदू म्हणून अजिंक्य उद्योग समूहाचा नावलौकिक झाला. अजिंक्य उद्योग समूहामुळे सातारा तालुका राज्याच्या सहकार क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिला आहे.

कोणत्याही पदाचा उपयोग लोकांसाठी झाला तरच त्या पदाचा नावलौकिक वाढतो. याची जाण आणि भान असेल्या मोजक्या राजकारण्यांमध्ये स्व. भाऊसाहेब महाराजांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मिळालेल्या प्रत्येक पदाचा उपयोग लोकांसाठी आणि समाजाच्या सामूहिक विकासासाठी कसा करून घ्यावा, लोकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी कसं करून घ्यावं आणि सामाजिक सलोखा कसा टिकवावा, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे भाऊसाहेब महाराजांचा जीवनपट! विकासवाटेवरचा हा प्रदीर्घ प्रवास आणखीही बरीच वर्षं सुरू राहील, असं वाटत असतानाच ४ फेब्रुवारी २००४ चा काळा दिवस उजाडला. सातारा शहर आणि तालुक्याच्या जनतेला हवंहवंसं वाटणारं व्यक्तिमत्त्व, राजघराण्यात जन्म घेऊनसुद्धा सातत्यानं सामान्यांच्यात रमणारं व्यक्तिमत्त्व, सगळ्यांचे लाडके भाऊसाहेब महाराज यांना त्या दिवशी नियतीनं आपल्यातून हिरावून नेलं. घराघरात सुखासमाधानाचा, समृद्धीचा दीप प्रज्वलित करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे भाऊसाहेब महाराज आज आपल्यात नाहीत, हे पटतसुद्धा नाही. कारण पावलापावलावर त्यांच्या पाऊलखुणा आहेत. साताऱ्याच्या कणाकणात आणि सातारकरांच्या मनामनात भाऊसाहेब महाराज आहेत. त्यांनी चेतवलेला विकासयज्ञ त्यांचे पुत्र आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जोमानं पुढं सुरू ठेवला आहे. सर्वसामान्य माणसाला बारा हत्तींचं बळ देणारे भाऊसाहेब महाराज अनेक रूपांनी आजही आपल्यात आहेत. यापुढंही कायम राहतील! सातारा तालुक्याचे भाग्यविधाते, सहकारमहर्षी भाऊसाहेब महाराज आपल्याला कायम समाजसेवेची प्रेरणा देत राहतील. त्यांच्या आदर्श विचारांच्या वाटेवरून समाजहितासाठी आपण अखंडपणे चालत राहू. राजकारणात राहूनही राजकारण न करणारा, जातपात, गटतट न मानणारा, उच्चनीच असा भेदभाव न करता प्रत्येकासाठी झिजणाऱ्या सर्वसामान्यांच्या या राजाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

अमर मोकाशी